
छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या आवडत्या असल्या तरी वाहिन्यांमध्ये आणि मालिकांमध्ये टीआरपीची स्पर्धा असते. त्यात ज्या मालिकांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभतो ती मालिका टीआरपीमध्ये सगळ्यांच्या वरचढ ठरते. मात्र ज्या मालिका प्रेक्षकांचं प्रेम मिळवण्यात अयशस्वी ठरतात त्या मालिका थेट बंद करण्याचा निर्णय चॅनेलकडून घेतला जातो. कलर्स मराठीवरील अशाच एका मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतलाय. मालिकेच्या मुख्य अभिनेत्रीने पोस्ट करत या बातमीला दुजोरा दिलाय आणि भावनिक पोस्ट शेअर केलीये.