

MANDAR AND GIRIJA COMEBACK
ESAKAL
छोट्या पडद्यावरील गाजलेली जोडी म्हणजे मंदार जाधव आणि गिरीजा प्रभू. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली ही जोडी प्रेक्षकांच्या गळ्यातलं ताईत बनली. त्यांच्या जोडीला प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळाली. मालिकेत काम करणारे कलाकार नेहमीच प्रेक्षकांच्या मनात घर करतात. प्रेक्षकांना ते आपल्याच घरातील सदस्य वाटतात. मंदार आणि गिरीजादेखील त्यातलेच. २०२० मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेली मालिका 'सुख म्हणजे नक्की काय असतं' गाजली त्याबरोबर त्यांची जोडीदेखील. आता हीच जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.