

manoj bajpayee
esakal
मुंबईका किंग कौन भिकू म्हात्रे असं म्हणत 'सत्या' चित्रपटातून ज्याने अख्ख्या मुंबईला वेड लावलं तो अभिनेता म्हणजे मनोज बाजपेयी. मनोज यांनी अनेक हिट सिनेमे दिले. त्यातही त्यांचा 'फॅमिली मॅन' प्रेक्षकांच्या मनावर कोरला गेलाय. याच मनोज बाजपेयी यांनी अभिनेता बनण्यासाठी चक्क आपल्याच घरातल्यांशी खोटं बोलून दिल्लीला जात असल्याचं सांगत पळ काढला होता. पण नॅशनल स्कुल ऑफ ड्रामामध्ये तब्बल ३ वेळा त्यांचा प्रवेश नाकारण्यात आला. मात्र त्यांनी हार मनाली नाही. मात्र त्यांच्या पहिल्या लग्नाबद्दल तुम्हाला ठाऊक आहे का? त्यांच्या पहिल्या पत्नीने फक्त २ महिन्यातच त्यांचं घर सोडलेलं.