

PANJAK VISHNU ON CHAR DIVAS SASUCHE
ESAKAL
छोट्या पडद्यावर अशा अनेक मालिका होऊन गेल्या ज्या आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत. त्यातलीच गाजलेली मालिका म्हणजे 'चार दिवस सासूचे' ई टीव्ही मराठीवर लागणारी ही मालिका गावागावात इतकी लोकप्रिय होती की प्रेक्षक ही मालिका पाहण्यासाठी बरोबर रात्री ८ वाजता सगळं काम सोडून टीव्हीसमोर बसायचे. या मालिकेची कथा तर गाजलीच पण त्यांतील पात्रही चांगलीच लोकप्रिय ठरली. याच मालिकेतून घराघरात पोहोचलेले लोकप्रिय अभिनेते पंकज विष्णू सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. पंकज यांनी मालिकेत रवीची भूमिका साकारली होती. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या मालिकेबद्दलचे काही किस्से सांगितलेत.