

neena gupta
ESAKAL
अभिनेत्री नीना गुप्ता आपल्या बिनधास्त बोलण्यासाठी आणि स्वभावासाठी ओळखल्या जातात. त्या त्यांचं आयुष्य कायमच स्वतःच्या नियमांवर जगल्यात. मुलीचा जन्म असो किंवा चित्रपटातलं करिअर. नीना यांनी नेहमीच स्वतःचे विचार परखडपणे मांडलेत. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी महिलांच्या सध्याच्या परीस्थितीवर भाष्य केलंय. बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ' पेक्षा आधी 'आजी-आजोबांना शिकवा' असं त्या म्हणाल्यात. सोबतच त्यांनी 'पंचायत' वेबसीरिज दरम्यानचा एक किस्सा सांगितलंय.