

pandharichi vari
ESAKAL
आषाढी एकादशी निमित्त टीव्हीवर एक चित्रपट हमखास दाखवला जातो तो म्हणजे 'पंढरीची वारी'. या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. असा प्रेक्षक शोधूनही सापडणार नाही ज्याने हा चित्रपट पाहिला नाही. या चित्रपटातील प्रत्येक संवाद आजही प्रेक्षकांच्या तोंडावर आहे. यातील गाणी अजरामर आहेतच सोबतच यातील कलाकारही प्रेक्षकांच्या मनावर कोरले गेलेत. चित्रपटात वारीला निघालेल्या आई आणि मुलीच्या जोडीला एक छोट्या मुलगा येऊन भेटतो आणि तो त्यांची वारीतील सगळी संकटं दूर करतो. हा खट्याळ विठोबा म्हणजे खरंच विठ्ठल असतो हे शेवटी समजतं. असं कथानक असलेला हा चित्रपट [प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेला. मात्र यातील खट्याळ विठोबा आज आपल्यात नाही.