
२००७ साली प्रदर्शित झालेल्या 'गाढवाचं लग्न' या चित्रपटाने तेव्हा धुराळा उडवून दिला होता. या चित्रपटाने लाखो प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं होतं. हा चित्रपट आजही प्रेक्षकांचा तितकाच आवडता आहे. आज इतक्या वर्षांनीदेखील या चित्रपटातील कलाकार आणि कथानक प्रेक्षकांच्या मनावर कोरला गेलंय. यातील डायलॉग तर चाहत्यांना तोंडपाठ आहेत. या चित्रपटात मकरंद अनासपुरे यांनी सावळ्या कुंभाराची भूमिका साकारली होती. तर राजश्री लांडगे हिने त्यांच्या पत्नीची म्हणजे गंगीची भूमिका साकारली होती. मात्र प्रेक्षकांना भावलेली ही गंगी अचानक कुठेतरी गायब झाली. आपल्याला इंडस्ट्रीतल्या ग्रुपनेच बाजूला केलं अशी खंत तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत बोलून दाखवली.