
छोट्या पडद्यावर प्रचंड गाजलेली मालिका 'काहे दिया परदेस' मधून दोन नवीन चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. एक होती अभिनेत्री सायली संजीव आणि दुसरा होता अभिनेता ऋषी सक्सेना. या मालिकेचा पहिला प्रोमो येताच प्रेक्षकांच्या नजरा या दोघांवरच खिळल्या होत्या. या मालिकेत त्यांनी शिव आणि गौरीची भूमिका साकारलेली. मराठी घरातील गौरी ही उत्तरप्रदेशमधील एका घरात लग्न करून जाते, अशी या मालिकेची संकल्पना होती. ही मालिका अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत होती. आता ऋषीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या भूमिकेबद्दल सांगितलं. सोबतच त्याच्या आणि ईशाच्या नात्याबद्दलही तो बोलला आहे.