

STAR PRAVAH MARATHI SERIAL TIME CHANGE
ESAKAL
छोट्या पडद्यावरील अनेक मालिका या प्रेक्षकांच्या प्रचंड आवडत्या आहेत. प्रत्येक मालिका जेव्हा सुरू होते तेव्हा त्या मालिकेचा एक वेगळा प्रेक्षकवर्ग बनतो. मात्र नव्या मालिकेसाठी जेव्हा या मालिकांची वेळ बदलण्यात येते. तेव्हा मात्र या मालिकांना फटका बसतो. त्यांचा टीआरपी कमी होतो. असाच काहीसा फटका स्टार प्रवाहच्या मालिकांना बसण्याची शक्यता आहे. स्टार प्रवाहने महिन्याभरापूर्वी दोन नव्या मालिकांची घोषणा केली होती. आता या नव्या मालिकांसाठी जुन्या मालिकांची वेळ बदलण्यात आली आहे त्यामुळे प्रेक्षक मात्र नाराज आहेत.