
छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या प्रचंड आवडत्या असतात. काही प्रेक्षक कामातून वेळ काढून टीव्हीवर मालिका पाहतात. तर काही अगदी प्रवासातही मालिका पाहताना दिसतात. त्यात काही मालिका प्रेक्षकांच्या प्रचंड आवडत्या असतात त्यांना चांगला टीआरपी मिळतो. तर काही मालिका प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करण्यात असमर्थ ठरतात आणि लगेच प्रेक्षकांचा निरोप घेतात. हा सगळा खेळ टीआरपीवर अवलंबून असतो. आता मागच्या महिन्यातल्या शेवटच्या आठवड्याचा टीआरपी समोर आलाय. यात स्टार प्रवाहचा टीआरपी कमी झाल्याचं दिसतंय.