
बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्या वृंदावनला गेल्या आणि तिथेच आपलं देहभान विसरून कृष्णभक्तीत तल्लीन झाल्या. या अभिनेत्रींनी कायमची मायानगरी सोडली आणि वृंदावनमध्ये शिफ्ट झाल्या. या अभिनेत्रींनीं इंडस्ट्रीला देखील रामराम ठोकला. आता या अभिनेत्रींच्या यादीत एका मराठी अभिनेत्रीचं नाव देखील घ्यावं लागेल. ही अभिनेत्री सगळं विसरून वृंदावनात रमलीये. आता मला मुंबईत करमत नाही असं म्हणत ती कृष्णभक्तीत रमलीये.