

‘‘लता! ए लता!!! ’’
श्री पाद जोशी घराखालून दीदीला हाका मारीत होता. दीदी त्या वातावरणातून स्वतःला सावरत कशीबशी बाहेर आली. आणि ‘‘ थांब मीच
खाली येते ’’ असे म्हणून ती खाली जायला निघाली, तोच श्रीपाद जोशीच वर चढून आला. घामाने डबडबलेला, हताश, उजाड, रडव्या सुरात तो म्हणाला. ‘‘ लता हॅास्पिटल मधून मालकांना आणले आहे आणि ऽऽऽ’’ दीदीने त्याला थांबवत अति आतुरतेने विचारले, ‘‘म्हणजे बाबा बरे आहेत.
इतक्या लवकर सोडले, म्हणजे बाबा ठीक आहेत. सकाळपासून मी देव पाण्यात ठेवले आहेत, मंगेशाने वाचवले त्यांना, चल त्यांना वर घेऊन येऊ या.’’ दीदी एका श्वासात बडबडत होती, बाबा सकाळी आजारी झाले आणि त्यांना हॅास्पिटलमध्ये नेले, तेव्हापासून दीदी स्वःतशी बडबडत होती, ‘‘लाई हयात आये कजा ले चली चले अपनी खुशी न आये न अपनी खुशी चले’’. या जगात ‘जन्म’ घेऊन आला आणि ‘मृत्यू’ घेऊन निघालाय, मी आपल्या मर्जीने आनंदाने आलो नव्हतो. आणि ना आपल्या मर्जीने आनंदाने निघायलोय.