Premium|Aar Paar songs: ‘आरपार’ने हिंदी सिनेमात नवा रंग भरला. गुरुदत्त आणि ओ. पी. नय्यरची ही जोडी आजही रसिकांच्या मनात घर करून आहे

Guru Dutt films १९५४: मधील हिंदी सिनेमात खय्याम, अनिल विश्‍वास, गुलाम मुहम्मद यांसारख्या संगीतकारांनी संघर्ष केला. पण गुरुदत्त ओ. पी. नय्यर यांच्या ‘आरपार’ने आगळंवेगळं संगीत देऊन रसिकांची मनं जिंकली
Aar Paar songs
Aar Paar songsesakal
Updated on
स्वातंत्र्याचा उत्सव आणि त्याखाली हेलकावणाऱ्या फाळणीच्या वेदनांमुळे मुंबईच्या चित्रनगरीत रोज एक वेगळी कथा लिहिली जात असे. त्याकाळच्या चित्रपटांची नावं, विषय, त्यांचं संगीत पाहिले तर मानवी मनाची कवाडं खुली होतील. त्यात अद्‍भुत असं जग दिसेल, अगदी ‘दुर्गापूजा’, ‘अमर कीर्तन’, ‘शमा परवाना’पासून आबे-हयापर्यंत; पण तरुणाई फिदा होती क्लब सॉँग्ज, फेल्ट हॅट-काळा चष्मा, रहस्यमयता, गुन्हेगारी विश्‍व आणि दिलफेक संगीतावर. ‘आरपार’ने तर गुरुदत्त आणि ओ. पी. नय्यर यांचं यश आरपार नेले.

सुलभा तेरणीकर

saptrang@esakal.com

भारतीयांच्या गोष्टीवेल्हाळ देशात सिनेमाने लोकांना चांगलेच गुंतवून ठेवले होते. खास महिलांसाठी ‘सुहाग सिंदूर’ तर निखळ मनोरंजनासाठी हुकुमी ‘अलीबाबा चाळीस चोर’ तसे ‘आफ्रिका’, फूजिलामा’, ‘खैबर’ असेसुद्धा येत होते आणि चित्रपट कोणत्याही विषयांचे असोत गाणी मात्र पाच-सात असायचीच. नक्षत्रांकित आभाळ असावे असा रणजित स्टुडिओ मात्र हळू हळू शेवटाकडे पावलं टाकत होता. सरदार चंदूलाल शहा यांचा दबदबा मात्र अजून ओसरला नव्हता. म्हणून ऐन बहरात असलेल्या राज कपूर, नर्गिसला घेऊन चित्रपट काढायचं त्यांनी ठरवलं असावं. पण ‘पापी’मध्ये राज-नर्गिस असूनही यश आले नाहीच. तीच गोष्ट ‘फूटपाथ’ चित्रपटाची. दिलीपकुमार-मीनाकुमारी असे खंदे अभिनेते होते.

तरीही ‘फूटपाथ’ची एक खूण मात्र राहिली, ती म्हणजे तलत मेहमूद यांनी गायलेलं ‘शाम-ए गम की कसम’ हे नितांत सुंदर गाणं! याचे संगीतकार होते खय्याम! फार वर्षांपूर्वी संघर्ष, उमेदवारीच्या काळात खय्यामना एक संधी आली होती, संगीत देण्याची! त्या वेळी त्यांनी काही चाली ऐकवल्या. निर्माता म्हणाला ‘या कसल्या चाली? नौशाद साहेबांसारख्या करा!’ स्वभावाने मानी, सच्चे आणि स्वयंभू विचाराचे खय्याम चित्रपट सोडून निघाले; पण एक चाल त्यांचा पाठलाग सोडत नव्हतीच. मग ‘फूटपाथ’च्या वेळी मजरूहसाहेबांनी गाणं लिहिलं. ‘शाम-ए-गम की कसम, आज गमगीं है हम, आभी जा आज मेरे सनम...’ उर्दू साहित्यात तिन्ही सांजेला वाटणारी हुरहूर, उदासीनता यावर विपुल लिहिलं गेलं आहे. ‘शाम-ए-गम’बरोबरच एकलेपण, विरहाचं दुःख असं काही दाटून आलं आणि त्याला तलतसारखा मखमली, मुलायम, मधाळ, मोरपंखी अशी सगळी विशेषणं लावावीत असा आवाज लाभला आणि एक जादू घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com