

बांग्लादेशातील राजकीय तणाव दिवसेंदिवस वाढतो आहे. Can Bangladesh Ensure Violence-Free Elections?
ई सकाळ
Elections Amid Turmoil: Bangladesh’s Democratic Test
कल्याणी शंकर, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक
बांगलादेशामध्ये होणारी निवडणूक मुक्त आणि निष्पक्ष होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. कोणत्याही दबावाखाली ही निवडणूक होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. निवडणुकीनंतर हिंसाचार होणार नाही, याची दक्षता युनूस सरकारने घेण्याची गरज आहे. शांततापूर्ण निवडणूक अर्थव्यवस्था सुधारण्यास नक्कीच मदत करणार आहे.
अस्थिर बांगलादेश
ऑगस्ट २०२४ : ऑगस्ट २०२४ मध्ये मोठ्या विद्यार्थी आंदोलनानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आणि भारतात आश्रय घेतला. त्यानंतर तेथे राजकीय अस्थिरता निर्माण झाली
अंतरिम सरकार आणि सुधारणा : बंडानंतर अंतरिम सरकारने देशाची व्यवस्था पूर्ववत आणण्यात आणि आर्थिक संस्थांना सावरण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, तसेच निवडणुका आणि सुधारणांसाठी मार्ग मोकळा केला.