

Chandan Vandan Fort history
esakal
छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्री रांगांतील गडदुर्गाचा उपयोग मोठ्या युक्तीने आणि कौशल्याने करून मोगल-आदिलशहाची जुलमी सत्ता उद्ध्वस्त करून लोककल्याणकारी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य, क्रांतिकारक आणि शौर्यशाली इतिहास समजून घ्यायचा असेल तर समकालीन ऐतिहासिक लिखित साधने जेवढी महत्त्वपूर्ण आहेत तेवढेच गडदुर्ग महत्त्वाचे आहेत. गडदुर्ग हे इतिहास आणि वर्तमानाला जोडणारे दुवे आहेत. ते इतिहासाचे साक्षीदार आहेत.