Premium| Maoist Insurgency: प्रशासन आणि सुरक्षा दलांच्या प्रयत्नांमुळे माओवादाचा प्रभाव कमी?

Chhattisgarh: नक्षलवादी चळवळीला आता घरघर लागली. सुरक्षा दलांनी त्यांच्या कारवायांना आळा घातला आहे.
naxal problem india
naxal problem indiaesakal
Updated on

मधुबन पिंगळे

पश्चिम बंगालच्या नक्षलबारी या छोट्या गावामध्ये १९६७मध्ये एका गटाने प्रस्थापित व्यवस्थेविरोधात उठाव केला आणि त्यातून नक्षलवादाची सुरुवात झाली. कनू सन्याल, चारू मुजुमदार यांच्याकडे या चळवळीचे नेतृत्व होते. आदिवासी समाजासाठी भूमीपुत्रांचे अधिकार आणि सामाजिक न्यायाच्या मागणी करण्यात येत होती आणि त्यासाठी हिंसेचा अवलंब करण्यात येऊ लागला.

पश्चिम बंगालमधून ही चळवळ छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, बिहार, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश-तेलंगण या भागांमध्ये पसरली. हा भाग ‘रेड कॉरिडॉर’ म्हणून ओळखला जातो. नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असणाऱ्या या वन प्रदेशामध्ये ही चळवळ फोफावत गेली. त्यानंतर २००४मध्ये या सर्व संघटना एकत्र आल्या आणि माओवादी कम्युनिस्ट पक्षाच्या छत्राखाली त्यांनी कारवायांना सुरुवात केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com