Electricity Bill Hike
Esakal
पुणे : घरात राहणारी माणसं तीच. त्यांचा वीजेचा वापरही तेवढाच. तरीही मागच्या महिन्यात आलेल्या बिलापेक्षा या महिन्याला बिलाचा आकडा वाढलेलाच असतो. कितीही काटकसर करून वीज वापरली तरी वीजेच्या बिलात मात्र काही फरक पडेना असा अनुभव तुम्हालाही आला आहे का?
कोरोनानंतर वीज बिलाचे आकडे हे दर महिन्याला नवनवे उच्चांक गाठतायेत की काय असा प्रश्न पडावा इतपत बिलांमध्ये फरक पडला आहे.
त्यामुळेच गेल्या काही काळात महावितरण आणि ग्राहकांमधे एक प्रकारचा संघर्षच सुरू झाला आहे. महावितरण आर्थिक संकटात असून त्यामुळे वीज दरवाढ करावी लागते आहे असे सांगितले जात असताना दुसरीकडे महावितरण विभागाकडे असलेली १ लाख कोटींची थकबाकी हा विरोधाभास देखील दिसून येतो आहे.
हा एकूणच संघर्ष का निर्माण झाला आहे, यामागची कारणे काय, एक महिना बिल भरायचं राहिलं तर सामान्य माणसाची वीज कापली जाते, अशा वेळी इतकी मोठी थकबाकी कशी काय निर्माण झाली आहे? ही थकबाकी मोठ्या कंपन्यांची आहे का, महावितरण वीज शुल्काव्यतिरिक्त अन्य बाबींमध्ये देखील दरवाढ करते आहे का? यात सरकारची भूमिका काय आहे या सगळ्याची माहिती या सकाळ+ च्या विशेष लेखाच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूया.