

Computer Science vs Core Engineering
esakal
दीपक सारंग - sakal.avtaran@gmail.com
एकेकाळी अभियांत्रिकी म्हणजे विविध शाखांमधील संधींचे विश्व होते. आज ते मोठ्या प्रमाणावर कॉम्प्युटर सायन्स आणि आयटीभोवती फिरताना दिसते; मात्र तंत्रज्ञानाच्या वेगवान बदलाच्या काळात एका शाखेच्या गर्दीत भविष्य सुरक्षित आहे का, याचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. कारण उद्याचा भारत घडवण्यासाठी केवळ कोड लिहिणारे नव्हे; तर नवे तंत्रज्ञान निर्माण करणारे आणि विविध क्षेत्रांना दिशा देणारे अभियंतेही आवश्यक आहेत.
‘शिक्षण हे केवळ पदवी मिळविण्याचे साधन नसते; ते राष्ट्राच्या भविष्याची दिशा ठरविणारे माध्यम असते.’ आज ही गोष्ट पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाची ठरते आहे. कारण महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी आणि त्यांचे पालक अशा एका टप्प्यावर उभे आहेत, जिथे प्रवेश प्रक्रियेत घेतलेला एक निर्णय पुढील चार दशकांच्या करिअरवर परिणाम करू शकतो.