

Sustainable industrial development India
esakal
संतोष शिंत्रे - पर्यावरणाचे अभ्यासक
वाढीव व्यापाराची, निर्यातीची पर्यावरणीय किंमत लक्षात घ्यायला हवी. धारणाक्षम उपाय करून उद्योग आणि सरकारला पर्यावरणाचे नुकसान थांबवता येईल. प्रश्न आहे तो राजकीय आणि औद्योगिक इच्छाशक्तीचा आणि जनमताच्या दबावाचा.
कोणे एके काळी, आयात-निर्यातशुल्क, व्यापाराच्या वाटाघाटी हे सर्व शांतपणे एका बाजूने चालू असे. लोकांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा फार ठसा उमटत नसे. जागतिक शांततेला हेच पोषक होते. सर्वच राष्ट्रे व्यापार-उदिम, निर्यात वाढवण्यासाठी प्रयत्नशील असायलाच हवीत. पण जेव्हा हे प्रयत्न आपल्या नागरिकांचे स्वास्थ्य आणि जीवनमान, आपले पर्यावरण-निसर्ग यांचा अपरिवर्तनीय विनाश घडवून केले जातात, तेव्हा मात्र ते ‘घर जाळून कोळशाचा व्यापार करणे’ या म्हणीच्या अर्थाचे तंतोतंत उदाहरण ठरतात.