Premium|Maharashtra Agriculture : आर्थिक संकटांपासून शेती वाचवा

Farmer Suicides Maharashtra : शेती आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी केवळ तंत्रज्ञानाचा वापर करून चालणार नाही, तर ती किफायतशीर होण्यासाठी शेतीचे अर्थकारण आमूलाग्र बदलावे लागेल.
Farmer Suicides Maharashtra

Farmer Suicides Maharashtra

esakal

Updated on

महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या हा अजूनही न सुटलेला गंभीर प्रश्न आहे. आजपर्यंत विविध प्रकारच्या सत्ताधाऱ्यांनी त्या रोखण्यासाठी अनेक उपाययोजना राबविल्या, मात्र त्यास अपेक्षित यश मिळालेले नाही. आजही राज्यात शेतकरी आत्महत्या करतच आहेत. शेती कर्जमाफी, नुकसान भरपाई, विमा, अनुदाने, शेतकरी सन्मान निधी यासारख्या सरकारी उपाययोजना राबवूनही शेतकरी आत्महत्या थांबण्याचे नाव घेत नाहीत. याचाच अर्थ शेती व्यवसाय तोट्यात असून, तो काही केल्या नफ्यात यायला तयार नसल्याचेच दिसते. यावरून या आत्महत्या रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना या वरवरची मलमपट्टी तर नाही ना, असा प्रश्न पडतो. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांच्या मुळाशी जाऊन परिणामकारक उपाययोजना राबविण्यासाठी धोरणात्मक विचार आवश्यक आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com