Fridship day special article in marathi
Esakal
पुणे - तुम्हाला जर सांगितलं की, तुमच्या मोबाईलमध्ये अशा किमान पाच माणसांची यादी सांगा ज्यांना तुम्ही अर्ध्या रात्रीला जरी फोन केला तरीही ते येतीलच असे तुम्ही खात्रीने सांगू शकता. तर अशा पाच लोकांची यादी काढणंही सध्याच्या काळात अनेकांना खूप अवघड होतं.
एकीकडे तुमच्या फोनमधील मित्रमैत्रीणी, सहकारी, नातेवाईक यांची यादी ही हजारांच्या घरात आहे, दुसरीकडे तुमच्या फेसबुक, इंस्टाग्रामच्या मित्रांची यादीही अभिमानाने सांगावी इतकी आहे. तरी अर्ध्या रात्रीला आपल्यासाठी कोण येईल यासाठी आपल्याला विचार का करावा लागतो?
आज फ्रेंडशीप डे साजरा केला जातो आहे.. त्यानिमित्ताने आपण खरोखरच एआय वर इतके अवलंबून रहायला का लागलो आहे की आपली माणसंच विसरलोय? की माणसाला माणसाचीच भिती का वाटते आहे म्हणून एआय वापरलं जातंय..? नेमकं हे गणित कुठे आणि का बिघडलंय, हे भारतातच आहे की जगभरात आहे, याविषयीची संशोधनं काय सांगतात, जागतिक आरोग्य संघटनेने एकटेपणाला सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न का म्हंटलं आहे आणि सध्याच्या मित्रमैत्रीणींना काय वाटतं असं सगळंच आपण या सकाळ+ च्या विशेष लेखाच्या माध्यामातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.