

Maratha Reservation History
esakal
मराठा आरक्षणाचा विषय केंद्रस्थानी आला की आंदोलनामुळे सगळा महाराष्ट्र ढवळून निघतो. १९८२ सालच्या आण्णा साहेब पाटलांच्या आंदोलनापासून जेव्हा जेव्हा मराठा आरक्षणासंबंधीची आंदोलने उभी राहिलीत तेव्हा तेव्हा सरकारला या आंदोलनांनी घाम फोडला आहे.
या ४ दशकांच्या काळात या आंदोलनांमध्ये अनेक अविश्वसनीय गोष्टी घडल्या आहेत. एका आमदाराने जनतेला शब्द दिला जर तुम्हाला मी उद्या पर्यंत आरक्षण मिळवून दिलं नाही तर मी उद्याचा सूर्य पाहणार नाही. आरक्षण मिळालं नाही म्हणून स्वत:चा शब्द पाळत या माणसाने समाजासाठी खरोखरच बलिदान दिलं. या चाळीस वर्षात मराठा क्रांती मूक मोर्च्यांची अभूतपूर्व शिस्त लोकांनी पाहिली. मुंबईच्या आंदोलनासाठी गावागावतून ट्रकच्या ट्रक भरून गेलेल्या चटणी-भाकरीच्या गाड्या पाहिल्या. अनेक वेगळे आयोग पाहिले. अनेक वेगवेगळे नेते आणि अश्वासने पाहिलीत.
आज पुन्हा एकदा हा विषय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. कारण मराठा आरक्षण आंदोलनाला तीन वर्षे पूर्ण होत असताना मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला अंतिम मुदत देत बेमुदत उपोषणाची घोषणा केली आहे. आता मनोज जरांगेच्या मागण्या काय आहेत आणि एकंदर या ४० वर्षातील या आंदोलनाचा इतिहास कसा राहिला आहे. हे सगळं सविस्तर जाणून घेऊया सकाळ+ च्या या लेखातून.