Premium|AI Self Reliance in India : एआयच्या युगात भारताला आत्मनिर्भर होणे का गरजेचे? डिजिटल वसाहतवादाचा वाढता धोका

Digital Sovereignty : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात भारतासमोर तंत्रज्ञान आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या नव्या आव्हानांचा सामना आहे. एआय, डेटा आणि महासंगणनातील आत्मनिर्भरता ही डिजिटल सार्वभौमत्वासाठी निर्णायक गरज बनत आहे.
AI Self Reliance in India

AI Self Reliance in India

esakal

Updated on

रोहित पांढारकर, एआय तज्ज्ञ

१५ ऑगस्ट, स्वातंत्र्यदिनाची सकाळ केवळ एक पर्व नाही, तर एका नव्या आणि अधिक गुंतागुंतीच्या वास्तवाशी सामना करण्याची वेळ आहे. हवेत असणारा स्वातंत्र्याचा तो उत्साह अनुभवत असताना जेव्हा आपण भूतकाळाकडे पाहतो, तेव्हा १९४७ च्या त्या सोनेरी पहाटेची आठवण येते. जेव्हा ब्रिटिशांच्या बुटाखाली तुडवला गेलेला भारत आपल्याच पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करत होता. त्या काळी अन्नधान्याची तीव्र टंचाई होती, म्हणून आपण ‘हरितक्रांती’ची हाक दिली आणि अन्नाच्या बाबतीत ‘आत्मनिर्भर’ झालो. पुढे एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जेव्हा माहिती तंत्रज्ञानाने जग बदलले, तेव्हा आपण जगाचे ‘बॅक ऑफिस’ बनून आपली बौद्धिक क्षमता सिद्ध केली. परंतु, आज २०२६ मध्ये आपण एका अशा महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहोत, जिथे तोफेच्या गोळ्यांपेक्षा ‘अल्गोरिदम’, ‘डेटा’ आणि ‘महासंगणन’ हे युद्धाचे नवे निर्णायक ठरत आहेत. आजचा सवाल केवळ आर्थिक किंवा तांत्रिक प्रगतीचा नाही, तर तो आपल्या सार्वभौमत्वाचा, आपल्या संस्कृतीचा आणि राष्ट्रीय सुरक्षेचा आहे. आज खरी गरज आहे ती ‘एआय’मधील (कृत्रिम बुद्धिमत्ता) आत्मनिर्भरतेची. कारण, जर आपण या मोर्च्यावर मागे पडलो, तर आपण अजाणतेपणे एका नव्या आणि अधिक धोकादायक ‘डिजिटल वसाहतवादा’च्या जाळ्यात अडकू, ज्यातून सुटणे ब्रिटिश राजवटीपेक्षाही अधिक कठीण जाईल.

परदेशी तंत्रज्ञानावरील अवलंबित्वाचा धोका

काही काळापूर्वी घडलेली एक सत्य घटना या संपूर्ण संकटाची भीषणता स्पष्ट करण्यासाठी पुरेशी आहे. एका मोठ्या पश्‍चिमेकडील महासत्तेने अचानक राष्ट्रीय सुरक्षेचे आणि धोरणात्मक नियमांचे कारण पुढे करत तिथल्या एका आघाडीच्या एआय कंपनीला आदेश दिला की, त्यांच्या अत्यंत प्रगतशील एआय मॉडेल्सचा वापर काही विशिष्ट परदेशी नागरिकांसाठी आणि भौगोलिक प्रदेशांसाठी तत्काळ बंद करावा. कोणतीही पूर्वसूचना नाही, न्यायालयीन लढा देण्याची संधी नाही आणि कसलीही तांत्रिक पारदर्शकता नाही. एका रात्रीत जगातील अनेक देशांतील लाखो युजर्ससाठी आणि कॉर्पोरेट कंपन्यांसाठी ते मॉडेल्स ‘स्विच ऑफ’ करण्यात आले. ज्या देशांनी किंवा कंपन्यांनी आपली संपूर्ण डिजिटल वाढ, वित्तीय व्यवस्था आणि सरकारी निर्णयप्रक्रिया त्या परदेशी एआय पायावर उभी केली होती, त्यांना समजले की भू-राजकीय संघर्षाच्या एका क्षणात त्यांची संपूर्ण डिजिटल अर्थव्यवस्था अंधारात ढकलली जाऊ शकते. ही केवळ एकांतातील भीती उरलेली नाही, तर आजच्या जागतिक राजकारणाचे क्रूर वास्तव बनले आहे. ज्याप्रमाणे १९७० च्या दशकात तेलाच्या बाबतीत अरब देशांनी ‘ऑइल एम्बार्गो’चे हत्यार उपसले होते, तीच गत आज अल्गोरिदम आणि कंप्यूट पॉवरच्या बाबतीत घडत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com