

पुणे: केंद्रीय जलवाहतूक मंत्रालयाद्वारे नुकतेच श्रीनगर येथे दोन दिवसीय चिंतन शिबिर पार पडले. या शिबिरात भारतीय ब्लू इकॉनॉमीच्या विकासासंदर्भात चहुबाजूने चर्चा करण्यात आली. येथे केंद्रीय जलवाहतूक मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्यासह अनेक तज्ञ मंडळी उपस्थित होती. या सभेत एकूण दोन लाख कोटी किमतीच्या प्रकल्पांवर चर्चा करण्यात आली. त्यातील किमान दीडशे प्रकल्प 6 सप्टेंबर 2025 पर्यंत पूर्ण केले जातील असे ठरवण्यात आले. केंद्रीय जलवाहतूक मंत्रालयाच्या चिंतन शिबिरातील निर्णयांविषयी अधिक जाणून घेऊया सकाळ प्लस च्या या विशेष लेखातून.