Air India Plane crashesakal
प्रीमियम आर्टिकल
Premium| Air India Crash: भारतीय हवाई प्रवासाची धास्ती
India's Air Safety Under Scrutiny: नुकत्याच झालेल्या विमान अपघाताने भारतीय हवाई वाहतुकीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. अपघाताची कारणे शोधण्यासाठी विविध समित्या आणि तज्ज्ञ कार्यरत आहेत.
सुनील चावके
केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली विमान अपघाताच्या कारणांच्या चौकशीसाठी स्थापन केलेली उच्चस्तरीय चौकशी समिती, अपघाताच्या कारणांची शहानिशा करण्यासाठी ब्रिटन सरकारने पाठवलेले तज्ज्ञांचे पथक आणि खुद्द बोईंग कंपनीकडून सांगितली जातील, ती कारणे , या सगळ्यांतून नेमके काय घडले ते यशावकाश समोर येईल. पण तोपर्यंत भारतीय हवाई वाहतूकक्षेत्रात हरतऱ्हेच्या बाजारगप्पांना उधाण आले आहे.
भारतात रेल्वेगाड्यांना आणि रस्त्यांवरील वाहनांना होणाऱ्या अपघातांच्या तुलनेत हवाई प्रवास सर्वात सुरक्षित ठरला आहे. रत्याने आणि रेल्वेने लांब अंतराचा प्रवास करुन अनेक तास घालविण्यापेक्षा दोन-तीन तासात दूरच्या शहरात पोहोचण्यासाठी वेळेची आणि त्या प्रमाणात पैशाची बचत करणाऱ्या विमान प्रवासाला मध्यम आणि उच्च मध्यमवर्गाची वाढती पसंती लाभली आहे.

