

Psychology of resilience and coping
esakal
१५ एप्रिल १९१२ च्या त्या काळरात्री, ''कधीही न बुडणारे'' अशी ख्याती असलेले ''आरएमएस टायटॅनिक'' अटलांटिक महासागराच्या गोठवून टाकणाऱ्या पाण्यात अदृश्य झाले आणि आपल्यासोबत १५०० हून अधिक आत्म्यांना जलसमाधी मिळाली. महासागराच्या रौद्र रूपाचा सामना करण्यासाठी या जहाजाची रचना करण्यात आली होती; त्याचे पोलादी आवरण जगातील सर्वात धोकादायक जलप्रवाहांवर मात करण्यासाठीच बनवले होते. तरीही, सभोवतालचा अथांग महासागर त्याच्या विनाशाला कारणीभूत ठरला नाही तर त्याच्या मजबूत आवरणाला पडलेले एक भगदाड आणि त्यातून आत शिरलेले पाणी, जे कप्प्याकप्प्याने पसरत गेले, तेच या महाकाय जहाजाच्या अंताचे कारण ठरले. ही सागरी शोकांतिका मानवी अस्तित्वासाठी एक अत्यंत अर्थपूर्ण रूपक (Metaphor) आहे. बाह्य आव्हाने, ती कितीही भयंकर असली तरी, क्वचितच आपला नाश करतात; परंतु आपण आपल्या आंतरिक संरक्षण व्यवस्थेला भेदून ज्या नकारात्मक विचारांना, विषारी संबंधांना, भ्रष्टाचाराला किंवा ढासळत्या मूल्यांना आत प्रवेश करू देतो, तेच आपल्या पतनाला कारणीभूत ठरतात.