

शेखर जोशी
जयंत पाटील ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्यात माहिर आहेत. मात्र सध्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांना त्यांच्या पक्षप्रवेशाच्या बातम्यांवर खुलासे करावे लागत आहेत. माध्यमांच्या या ससेमिऱ्यावर नाराज जयंतरावांनी नितीन गडकरींच्या उपस्थितीत इस्लामपुरात झालेल्या कार्यक्रमात माध्यमांवर तोंडसुख घेतले. त्यानंतरही त्यांच्या कथित भाजपप्रवेशाचे भूत काही हटता हटेना, अशी स्थिती आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना एकाच विषयावर सातत्याने ‘डिफेन्स’ करावा लागतो, हे जयंतराव आणि पक्षासाठी चांगले लक्षण नाही.