

Rural Nursery Business
esakal
सिद्धेश सावंत - sakal.avtaran@gmail.com
मुंबईतील स्थिर आयुष्य सोडून माधुरी-प्रतीक आपल्या मुळांकडे परतले. रत्नागिरीत नर्सरी उभारताना त्यांनी केवळ स्वतःचं आयुष्य बदललं नाही, तर गावाभोवती रोजगार, निसर्ग आणि स्थानिक अर्थकारणाचं एक छोटं इकोसिस्टमही उभं केलं.
‘तूकाय करणार परत गावी येऊन’ माधुरीच्या बाबांचा हा पहिला प्रश्न होता, जेव्हा तिने सांगितलं की ती मुंबईतली नोकरी सोडून आता पुन्हा गावी येणार आहे. त्या दिवसापासून पुढचे काही दिवस तिचे बाबा तिच्याशी फारसं काही बोलले नव्हते.
बरीच वर्षं गेली. माधुरी-प्रतीक यांनी एकत्र मिळून गावातच काम सुरू केलं. नर्सरी चालवली. वेगवेगळे प्रयोग केले. त्या प्रयोगाची दखल महाराष्ट्र सरकारने घेतली. दोघांना जेव्हा राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला, तेव्हा माधुरीच्या बाबांना हळूहळू लक्षात येऊ लागलं होतं, की आपल्या मुलीचा निर्णय योग्य होता.
माधुरी-प्रतीक रत्नागिरीत ‘वृक्षवल्ली’ नावाने एक नर्सरी चालवतात. कोकणातील अनेक नर्सरीपेक्षा ‘वृक्षवल्ली’ नर्सरी वेगळी ठरते ती या दोघांच्या स्टोरीमुळेच!