

महाराष्ट्र सरकारच्यावतीने राज्यभर सर्व जिल्ह्यांतून जो ‘बोलीचा जागर’ घेतला गेला.
ई सकाळ
Marathi Language Day Special: Celebrating the Power of Dialects
डॉ. केशव देशमुख, प्राध्यापक व मराठी भाषा, बोलीचे तज्ज्ञ
‘‘अलीकडे चांगलं लिहून होतंय, कारण लोक गावाकडच्या आपल्या भाषेत आत्मविश्वासानं लिहायला लागले. गावठी लिहायला लागले." असे प्रतिपादन भालचंद्र नेमाडे यांनी एका मुलाखतीत केलेले वाचले. अर्थात बोलीभाषेच्या सर्जक उपयोजनांबद्दलचे हे महत्त्वाचे प्रतिपादन आहे.
खरं म्हणजे शिकलेल्या लोकांनी बोलीभाषेला अधिक हिणविले. शुद्ध बोलावे, अशा एकप्रकारच्या धाकामुळे बोलीतून बोलणाची आणि बोलीतून लिहिणाऱ्यांची हिंमत खचली असेल तर नवल नाही.
या अनुरोधाने नुकताच महाराष्ट्र सरकारच्यावतीने राज्यभर सर्व जिल्ह्यांतून जो ‘बोलीचा जागर’ घेतला गेला, तो उपक्रम अर्थातच बोलीभाषेचे ममत्व आणि महत्त्व अधोरेखित करणारा होता.