

प्रवीण वानखेडे
नागपूर शहरात आता उन्हाळा सुरू झाल्यावर पाण्याची समस्या जाणवायला लागली आहे. अनेक ठिकाणी तर पाणी भरण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळत आहेत, हे दृश्य ग्रामीण भागात काही नवीन नाही. परंतु, आता हे चित्र शहरातही काहीसे बदलत चालले आहे. शहराचा मोठ्या झपाट्याने विकास होत आहे. इतर शहराच्या तुलनेत नागपुरात मोठ्या प्रमाणात बांधकामे केली जात आहे. सद्यःस्थितीत सर्वांच्या घरी नळ आहे. पण नळाला पाणी येत नाही. अशीच काहीशी परिस्थिती शहरातील काही परिसरांमध्ये उद्भवल्याचे दिसून येते.