
शिरीष देशपांडे
देशपातळीवर २००२ मध्ये तत्कालीन केंद्र सरकारने प्रथमच सहकार धोरण निश्चित करून देशातील सहकाराला नवीन दिशा देण्यासाठी पाऊल उचलले. त्यानंतर देशातील सहकार क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी बदल होण्यास प्रारंभ झाला.
परंतु कालमानपरत्वे अन् बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे हवे तसे बदल होऊ शकले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. पंतप्रधान मोदींनी २०२१ मध्ये सहकार विभागासाठी स्वतंत्र मंत्रालय सुरू केले. या क्षेत्राशी संबंधित विविध घटकांशी चर्चा करून नवीन सहकार धोरण तयार करून केंद्र सरकारला सादर केले. सरकारने हे धोरण २४ जुलै २०२५ रोजी जाहीर केले. त्यानिमित्त घेतलेला आढावा...