

गेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाली नाही, त्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे पंकजा मुंडे या नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यांनी मात्र पक्षाने दिलेले काम पूर्ण क्षमतेने करणे सुरू ठेवले होते. पक्षनिष्ठा ढळू दिली नाही. त्यामुळे त्यांना विधानपरिषदेवर घेण्यात आले व आता मंत्रिमंडळात पर्यावरण आणि हवामान बदल, पशुसंवर्धन खात्याचे मंत्रिपद देण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून विविध घडामोडींमुळे बीड जिल्हा चर्चेत होता. मात्र त्यावर फारसे भाष्य पंकजा मुंडे यांनी केले नव्हते. सध्याच्या बदलत्या परिस्थितीबाबत पंकजा मुंडे यांची ‘सरकारनामा’च्या प्रतिनिधी दीपा कदम यांनी घेतलेली मुलाखत...