रोपवे चा थरारक प्रवास करायचाय मग हे जाणून घ्या...

झारखंडच्या रोप वेच्या दुर्घटनेनंतर रोप वे प्रवासाविषयी बोललं जातंय
Rope way
Rope way E sakal
Updated on

झारखंडच्या देवघर येथे त्रिकूट डोंगरावरील रोप-वेच्या दुर्घटनेने देशभरात खळबळ उडाली. कारण आपल्याकडे मुळातच रोपवेचे प्रमाण कमी आहे आणि दुर्घटनांचे प्रमाणही नगण्य आहे. या माध्यमातून असंख्य पर्यटक, भाविक रोप-वेचा आनंद लुटतात. या माध्यमातून निसर्ग जवळून अनुभवण्याची संधी मिळते. मग हिमालयीन रांगा असो किंवा एखादे उंचीवरचे धार्मिक ठिकाण असो. पण देवघरसारख्या घटनेने रोप-वेबाबत नागरिकांच्या मनात अस्वस्थता निर्माण होणे स्वाभाविक आहे. पण अपघात होतो म्हणून आपण प्रवास करण्याचे सोडून देत नाही. त्याचप्रमाणे ती एक दुर्घटना होती आणि तशी दुर्घटना पुन्हा होऊ नये याची खबरदारी सर्वांनी घ्यायला हवी.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com