कौटुंबिक स्वास्थ हरपलं....घ्या 'या' गोष्टींचा शोध!

कौटुंबिक स्वास्थ टिकवून ठेवणे ही मोठी जिकिरीची बाब बनली आहे. ते टिकवून ठेवण्यासाठी काय करता येईल
Family Health
Family Health

कोरोना काळात कौटुंबिक हिंसाचारात लक्षणीय वाढ झाल्याचे पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारींवरून लक्षात येत आहे. सुमारे पावणेदोन वर्षात कोरोनामुळे अनेक कुटुंबातील स्वास्थ हरपले आहे. कोठे कुटुंब प्रमुखाची नोकरीच गेली तर कोठे घरातील कर्त्या व्यक्तीचे किंवा कुटुंबाला बांधून ठेवणाऱ्या सदस्याचे कोरोनामुळे निधन झालेले असते. अशा परिस्थितीत कौटुंबिक स्वास्थ टिकवून ठेवणे ही मोठी जिकिरीची बाब बनली आहे. ते टिकवून ठेवण्यासाठी काय करता येईल...! (Family Health)

एरव्ही सकाळी बाहेर पडले की सायंकाळी उशिरा येणाऱ्या घरांतून गेल्या पावणेदोन वर्षात सर्व सदस्य एकत्रितरीत्या नांदत आहेत. घरात किंवा कुटुंबासोबत इतका काळ रमण्याची सवय नसलेल्यांना सुरुवातीच्या काळात हे पचायला जरा अवघड गेले. वर्षातील एखादी सहल सोडल्यास कुटुंबासोबत इतका काळ राहणे शक्य नसलेल्यांसाठी ही मोठी शिक्षाच होती. परंतु परिस्थितीने कुटुंबाला समजून घ्यायला भाग पाडले. परंतु यातून समजून घेण्यापेक्षा वादाचेच प्रसंग अनेकदा निर्माण झाले. त्यातून अनेक घरातील वाद विकोपाला जाऊन ते थेट पोलिस ठाण्यांपर्यंत गेले. मुळातच भारतीय संस्कृती ही एकत्र कुटुंब पद्धतीचा पुरस्कार करणारी आहे. एकेका घरात पंधरा-पंधरा सदस्य किंवा त्यापेक्षा अधिक सदस्य अगदी गुण्यागोविंदाने नांदत असत. आजही शहरी नव्हे परंतु ग्रामीण भागात एकत्र कुटुंब पद्धतीची वीण घट्ट आहे. एक कुटुंब एक चूल अशीच प्रथा आहे. या कुटुंबात तुलनेत मानसिक स्वास्थ्याचे प्रमाण चांगले असल्याचे अनेक उदाहरणांतून स्पष्ट झाले आहे. वाढत्या शहरीकरणामुळे कुटुंबातील हा एकजिनसीपणा लोप पावायला लागला. कुटुंबातील सदस्य संख्येवरही त्याचा परिणाम व्हायला लागला. परिणामी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आता तर ‘नॅनो फॅमिली’ ही संकल्पना रूढ होत असल्याने समस्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. यासाठी कुटुंबव्यवस्था सुदृढ करण्यासाठी काही घटकांकडे आवर्जून लक्ष देण्याची आवश्यकता आहे. कुटुंब व्यवस्थेत सर्वांत महत्त्वाचा घटक एकमेकांतील संवाद आवश्यक असतो. नेमका आताच्या काळात तोच कमी होत आहे. घरात सर्व सदस्य एकत्र असले तरी सर्वांची तोंड वेगवेगळ्या दिशेला किंवा मोबाईलमध्येच असतात. प्रत्येक सदस्य कोणत्या तरी स्क्रिनसमोर असतोच. घरातील संवाद हरपल्याने अनेक समस्या निर्माण होतात. कुटुंबात सुसंवाद राहिल्यास अनेक समस्यांवर कुटुंबातच तोडगा निघू शकतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com