पालकांनो, मुले आळशी एकलकोंडी बनलीत, काय करावे?

Children's Health Tips in marathi
Children's Health Tips in marathi

कोरोना रुग्णांची वाढती संख्या या धास्तीने आता पुन्हा लॉकडाउनच्या वळणावर आपण उभे आहोत. याची सुरूवात म्हणून शाळा, महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना किती वाढतोय यावर निर्बंध आणि लॉकडाउनचा कालावधी ठरेल. सध्यातरी निर्बंधाचा पहिला फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांचा कालावधी सोडला तर मुले पुन्हा घरातच बसणार आहेत. शाळाच नसल्याने बौद्धिक व शारिरिक वाढीवर विपरीत परिणाम होत आहे. मुले आळशी बनली आहेत. तसेच ती एकलकोंडी बनली आहेत. मग यावर उपाय आहेत का? हो आहेत.

गेल्या काही वर्षांत पती-पत्नी आणि एक अपत्य अशी संकल्पना रुजली आहे. अलीकडची पिढी तर याचे पक्के समर्थक आहेत. त्यामुळे आई-वडील कामावर आणि मुल शाळा व पाळणाघर असे चित्र सभोवती दिसत आहे. एकच अपत्य बास हा त्यांचा निर्णय का याविषयी मतमतांतरे असू शकतील. मात्र, एक निष्कर्ष असा आहे की, ही मुले एकलकोंडी बनतात. काही वर्षांपूर्वीचा काळ आठवून बघा. मामाचा गाव, शेती, सामुदायिक जेवणं, नदी-विहिरीत डुंबणं, सणासुदीत एकत्र येणं, अंगणातील-पारावरील गप्पागोष्टी, शाळेला एकत्र जाणं, आजी-आजोबांच्या मांडीवर बसून गोष्टी ऐकणे...संपून गेलं आहे. यातील काहीच राहिलं नाही. हेच सारं हरवलंपण मुलांमध्ये, त्यांच्या पालकांमध्ये उतरलं आहे. असंख्य घरात आईच्या हातचा स्वयंपाक होत नाही. ऑनलाइन फूड ऑर्डर हा स्टेट्स सिंबॉल बनला आहे. सगळे जीवनचक्र यंत्रवत बनले आहे. सकाळी उठल्यापासून सर्वजण आपापल्या कामात, एकमेकाशी कोणी बोलतच नाही. म्हटलं तर हाती भरपूर वेळ असतो, मात्र त्याचा वापर कसा करायचा हे कोणाला समजत नाही. कुटुंबातील संवाद संपला आहे. हाती सतत मोबाईल. त्यावरील गप्पा सर्व आभासी. सोशल मिडियावरील मित्रसंख्या हेच वास्तव मानून जगणं सुरू झालं आहे. सुट्टी असली तरी घरी एकमेकाशी काय बोलायचे ही समस्या लोकांना झाली आहे. एकूण काय तर कुटुंबेच विचित्र मानसिकतेत सापडली आहे. त्यात आता भर कोरोना संकटाची पडली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com