Premium|History of Rajmachi Fort : सह्याद्रीतील राजमाची दुर्गाचा वैभवशाली आणि संघर्षमय इतिहास

Strategic Importance of Rajmachi : सह्याद्रीच्या कुशीत वसलेला राजमाची दुर्ग हा इतिहास, व्यापार आणि संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा गड मानला जातो. अनेक राजवटींचा वारसा जपणारा हा दुर्ग आजही भव्यतेने उभा आहे.
History of Rajmachi Fort

History of Rajmachi Fort

esakal

Updated on

डॉ. श्रीमंत कोकाटे - shrimantkokate1@gmail.com

सह्याद्री पर्वतरांगा जशा जैवविविधतेने बहरलेल्या आहेत, तशाच त्या गडकिल्ल्यांनी नटलेल्या आहेत. या गडकिल्ल्यांनी इतिहास घडविला. छत्रपती शिवाजी महाराजांनी जशी मावळ्यांना अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली, जे झोपले होते त्यांना जागे केले, जे जागे होते त्यांना उभे केले आणि जे उभे होते त्यांना भगवे निशाण घेऊन धावायला शिकवले, मुर्दाड झालेल्या भारतीयांच्या मनात हिंदवी स्वराज्याची ज्योत पेटवली त्याप्रमाणेच निर्जीव गडदुर्गांना त्यांनी अन्याय-अत्याचाराविरुद्ध लढायला शिकविले. सह्याद्री पर्वतराजीच्या साहाय्याने अर्ध्या आशिया खंडावर वर्चस्व गाजविणाऱ्या मोगलांना आणि दक्षिण भारताला जबड्यात घेऊन बसलेल्या आदिलशहाला शिवाजी महाराजांनी नेस्तनाबूत केले. त्या गडदुर्गापैकी महत्त्वाचा दुर्ग आहे, लोणावळा-खंडाळ्याजवळील राजमाची दुर्ग! कोकण आणि घाटमाथ्याला जोडणारे अनेक घाट आहेत, त्यापैकी बोरघाट हा महत्त्वाचा घाट आहे. या घाटाजवळ असलेला राजमाची हा महत्त्वाचा दुर्ग आहे. एकाच वेळेस मावळातील तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर, पूर्वेकडील भीमाशंकर, ढाकदुर्ग आणि कोकणातील कर्नाळा, प्रबळगड यांच्या संरक्षणासाठी राजमाची दुर्गाची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. संरक्षणाच्या दृष्टीने हा अजिंक्य आणि दुर्गम गड आहे. आजही तिथपर्यंत पोहोचणे कठीण आहे. घनदाट जंगलाने आणि दऱ्या-खोऱ्यांनी वेढलेला हा दुर्ग आहे. त्यामुळे प्राचीन काळापासून राजमाची दुर्गाचे महत्त्व आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com