Premium|tourism ethics : पर्यटनाचा आनंद घेताना जबाबदाऱ्या विसरतोय का?

tourist behavior : कोविडनंतर पर्यटनाचे स्वरूप बदलले आहे; लोक अनुभव आणि आनंदासाठी फिरतात, परंतु नियम, स्वच्छता, सार्वजनिक कर्तव्य आणि स्थानिकांचा आदर आवश्यक आहे. पर्यटनामुळे रोजगार व अर्थव्यवस्था वाढतात, परंतु चुकीच्या वर्तनामुळे पर्यावरण आणि इतर प्रवाशांवर परिणाम होतो. आनंदाचा अनुभव घेताना जबाबदारी आणि नैतिकता विसरू नये.
tourism ethics

tourism ethics

esakal

Updated on

विठ्ठल काळे

प्रवासाचा किंवा पर्यटनाचा आनंद मिळवत असताना आपल्यावर काही जबाबदाऱ्या आहेत, याचा आपल्याला विसर पडला आहे का? पर्यटन येत्या काळात खूप मोठा ‘व्यवसाय’ होऊ पाहतो आहे. जर व्यवसाय म्हणून त्याची वाढ होणं अपेक्षित आहे; तर त्याचे नियमही पाळले पाहिजेत... विडनंतर लोक मोठ्या संख्येने बाहेर फिरायला जाऊ लागले आहेत’ हे वाक्य आपण बऱ्याच वेळा ऐकतो. हे वाक्य खरं आहे की खोटं, हा संशोधनाचा विषय आहे. संशोधन यासाठी की जर, हे खरं असेल तर ‘का’ हा मोठा प्रश्न उभा राहतो. कोविडनंतर लोकांच्या विचारांमध्ये काय फरक पडला? ‘खर्चिक’ असूनही लोक का फिरायला जात आहेत? कोविडमध्ये आयुष्याचा क्षणभंगुरपणा अधोरेखित झाला आहे का? ‘जे आहे ते आताच आहे... आयुष्य मनमुराद जगून घ्या, आनंद घ्या, स्वतःसाठी जगा’ असे नवीन अलिखित सामाजिक नियम तयार झाले आहेत का? या नवीन नियमांचा आधार घेत माणूस यातून आनंद मिळवू पाहत आहे. स्वतःबरोबरच आपल्या कुटुंबानेही फिरावं, वेगवेगळी प्रेक्षणीय स्थळं पाहावीत, निसर्ग, मानवनिर्मित अद्‍भुत कलाकृती पाहाव्यात, त्याचा आनंद घ्यावा, अशी इच्छा प्रबळ होत आहे; परंतु हा आनंद मिळवत असताना आपल्यावर काही जबाबदाऱ्या आहेत, याचा आपल्याला विसर पडला आहे का?

Loading content, please wait...

Related Stories

Bhishacha Kada tourist safety Ratnagiri
Best places to visit in Shirala during monsoon
Nainital is witnessing record tourist footfall even during the monsoon season, boosting hotels, boating, local markets and tourism businesses across Uttarakhand.
Raigad
Marathi News Esakal
www.esakal.com