

Sangramdurga History
esakal
छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. त्यानंतर लगेच तोरणा आणि राजगडपाठोपाठ १६४७ मध्ये त्यांनी आदिलशहाच्या ताब्यात असणारा चाकणचा किल्ला जिंकून घेतला आणि त्याला ‘संग्रामदुर्ग’ असे नाव दिले. किल्लेदार फिरंगोजी नरसाळा आणि ३५० मावळ्यांच्या शौर्याने पावन झालेल्या संग्रामदुर्गचा वैभवशाली इतिहास अजरामर असाच आहे...