डॉ. स. प्र. सरदेशमुख
आयुर्वेदात हृद्रोगासाठी विशेष आनुषंगिक उपक्रम सांगितला आहे, तो म्हणजे हृद्बस्ती. यात विशिष्ट काळासाठी उरप्रदेशी (छातीवर हृदयाच्या जागी) औषधी तेल धारण केले जाते. यामुळे छातीत धडधडणे, दुखणे, जड वाटणे अशा लक्षणांपासून आराम मिळतो.
हृदयविकार झाल्यावर उपाय करण्यापेक्षा हृदयविकार होऊच नयेत म्हणून आयुर्वेदात सांगितलेला आहार, जीवनशैली, आयुर्वेदिक उपचार व पंचकर्म यांचा अवलंब केल्याने निश्चितच लाभ मिळू शकतो.
हृदय शरीरातील सर्वांत महत्त्वाच्या अवयवांपैकी एक. आयुर्वेदात हृदयाला ‘मर्म’ असे म्हणतात. मर्म म्हणजे असा अवयव ज्यावर आघात झाल्यास मृत्यूही येऊ शकतो. अशा ‘मार्मिक’ हृदयाला आयुष्यभर जपावे लागते. नाहीतर ते हृदयरोगाची शिकार होण्याचा संभाव्य धोका असतो.