लयनकथा ।अमोघ वैद्य
सुरुवातीला असं वाटलं, की जोगीमारा लेणं राहण्यासाठी होतं. पुरुष पायऱ्यांवर झोपत असावेत, तर स्त्रिया सभागृह किंवा खण्यांमध्ये राहत असाव्यात. पण तिथल्या शिलालेखांचं भाषांतर झाल्यावर, काही विद्वानांनी हे लेणं भारतातील पहिलं नाट्यगृह असावं असं सांगितलं. मात्र, नाट्यगृहाच्या मतावर सगळे सहमत नाहीत. कारण पायऱ्यांच्या रचनेनुसार रंगमंचाकडे प्रेक्षकांची पाठ राहते, त्यामुळे तो रंगमंच नव्हता, असं म्हणता येऊ शकतं.