

Fasting
esakal
डॉ. सुबोध देशमुख
उपवासामुळे रक्तातील विषारी घटक बाहेर टाकले गेल्यामुळे रक्ताभिसरण सुधारते, त्वचेवर नैसर्गिक चमक येते. या काळात शरीरातील जुन्या पेशींचे पुनरुज्जीवन होत असल्याने आपली रोगप्रतिकारशक्ती अधिक मजबूत होते आणि विविध संसर्गजन्य आजारांशी लढण्याची ताकद शरीराला प्राप्त होते. उपवास हा मन आणि शरीरशुद्धीचा मार्ग आहे. त्याला केवळ उपासमारीचे स्वरूप देऊ नका. सकस आहार आणि नियमित व्यायाम यासोबतच अधूनमधून केलेला शास्त्रोक्त उपवास तुम्हाला दीर्घायुषी करू शकतो.