

डॉ. सदानंद मोरे
वैचारिक घुसळणीतून आणि वास्तवातील संघर्षातून जिला उदारमतवादी लोकशाही म्हणतो ती राजकीय व्यवस्था निर्माण झाली. ती भांडवलशाहीला पूरक आणि पोषक होती, हे वेगळे सांगायची गरज नाही.
त्यामुळे ती भांडवलदारांच्या नियंत्रणाखाली येते व तिने दिलेली वचने वास्तवात प्रत्यक्षात येऊ शकत नाही, या धारणेतून साम्यवादी व्यवस्था क्रांतीच्या माध्यमातून उदयाला आली खरी; पण तीसुद्धा दिलेल्या वचनांची पूर्ती करण्यास असमर्थ ठरल्याने तिच्याविरुद्ध उठाव होऊन पूर्वीचीच व्यवस्था बरी म्हणून अनेक देश भांडवली लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात सामील झाले.