मधुकर कांबळे
छत्रपती संभाजीनगरची पूर्वीची आणि आजचीही ओळख म्हणजे ५२ दरवाजांचे शहर, अर्थात ‘सिटी ऑफ गेट्स’! याची साक्ष हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढेच आजही चांगल्या स्थितीत असलेले ऐतिहासिक दरवाजे देतात. अहमदनगरच्या निजामाचा प्रधान मलिक अंबरने वसवलेले हे शहर. मलिक अंबरने सुमारे ४०० वर्षांपूर्वी नहर-ए-अंबरी बांधून शहराच्या पाणीपुरवठ्याला चालना दिली. हे शहर केवळ दरवाजांचे नव्हे, तर वाडी, पुरा, बाजार, तटबंदी आणि नहरींचे शहर आहे.