Premium|Sant Janabai Abhang : संत जनाबाईंच्या अभंगातून स्त्रीवादी विचारधारेचा उदय

Warkari Sampradaya History : मराठी संतकाव्याच्या परंपरेत संत जनाबाईंचे स्थान अढळ असून, त्यांनी आपल्या अभंगांतून तत्कालीन सामाजिक बंधने झुगारून भक्तीचा एक असा 'स्त्रीवादी' आणि 'आध्यात्मिक लोकशाही'चा नवा मार्ग उघडला, जो आजही जनसामान्यांच्या मनात जिवंत आहे.
Sant Janabai Abhang

Sant Janabai Abhang

esakal

Updated on

डॉ. रवींद्र शोभणे

नामदेवांच्या घरी असलेल्या विठ्ठलभक्तीचा प्रभाव किंवा परिणाम जसा नामदेवांवर झाला तसाच तो त्यांच्या आधी जनाबाईवर झाला होता. एरवी जनाबाई त्यांच्या घरात गेली नसती तर हा प्रभाव तिच्या व्यक्तिमत्त्वावर झाला असता की नाही, याचे उत्तर नक्की देता येत नाही.

मराठी संतकाव्याच्या परंपरेत संत जनाबाई हे नाव अतिशय महत्त्वाचे मानले जाते. यांनी केलेली काव्यनिर्मिती संतसाहित्यातच नव्हे, तर पुढील काळातसुद्धा जनमानासात तेवढीच स्थान मिळवणारी अशी ठरली आहे. विशेषतः मराठीत स्त्रीवादी साहित्याची चळवळ निर्माण झाली, त्या काळात महाराष्ट्रातील स्त्रीवादी लेखिकांनी ताराबाई शिंदे यांचा ‘स्त्री-पुरुष तुलना’ हा निबंध आणि त्याआधी संत जनाबाईंचे अभंग आपल्या अभिव्यक्तीसाठी आधाराला घेतल्याचे दिसून येते. विशेषतः ‘डोईचा पदर आला खांद्यावरी । भरल्या बाजारी जाईन मी ।।’ यातील बंधमुक्त भूमिका, पारंपरिक जोखडांना झुगारणारी विचारधारा म्हणून या अभंगाकडे मोठ्या आदराने पाहिले जाते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com