यंदाच्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत असल्यामुळे राज्यात दुष्काळाचे सावट आहे. महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या साप्ताहिक अहवालानुसार आजमितीला राज्यात पाणी पुरवठ्यासाठी अडीच हजारांपेक्षा अधिक टँकर वापरले जात आहेत. यावरून पिण्याच्या पाण्याच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येते.
आज राज्यात टँकरची सर्वाधिक संख्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील दुष्काळाची चर्चा करताना प्रशसकीय पातळीवर दुष्काळ कसा जाहीर केला जातो? त्यासाठीचे निकष कोणते असतात? दुष्काळाच्या काळात कोणती पावले उचलणे अपेक्षित आहेत? दुष्काळाचे समाजावर कोणते परिणाम दिसून येतात? अशा काही प्रश्नांचा वेध...