

डॉ. गीताली वि. मं.
हवामान बदलाचं अरिष्ट, आभासी जगातला असत्य माहितीचा भडिमार, ट्रोलिंग, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या परिणामांची अनाकलनीयता अशा भयंकराच्या दारात आपण सर्वचजण उभे आहोत. त्याविरुद्ध लढण्यासाठी प्रथम लोकशाही जिवंत ठेवून सशक्त करायला हवी. या काळात स्त्रियांनी पक्षीय राजकारणात सजगपणे सक्रिय व्हायलाच हवं. तसंच व्यापक एकोपा होण्यासाठी सहकार्य, संवाद आणि सर्वसमावेशकताही गरजेची आहे. अन्यायाविरुद्ध हस्तक्षेप करत असतानाच सैद्धांतिक अभ्यासही सातत्याने करण्याची निकड आहे. त्यासाठी विविधता जपत समन्वयाचे सेतू उभारू या. यातूनच ‘हम होंगे कामयाब’ हा नारा बुलंद होईल.