Premium|Chhatrapati Shivaji Maharaj Strategy : भारत भाग्यविधाता.....

Maratha History and Administration : छत्रपती शिवाजी महाराजांची राजकीय दूरदृष्टी, गनिमी कावा, आणि लोककल्याणकारी प्रशासकीय धोरणे यांच्यामुळेच त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत हिंदवी स्वराज्याची निर्मिती करून भारताचा इतिहास बदलला.
Chhatrapati Shivaji Maharaj Strategy

Chhatrapati Shivaji Maharaj Strategy

esakal

Updated on

केदार फाळके

युद्ध हे राजनीतीचे प्रभावी साधन असल्यामुळे प्रशासक आणि सेनानायक यांचा अतूट संबंध असतो. सतराव्या शतकात या दोन्ही भूमिका स्वतंत्र नव्हत्या; त्या एका व्यक्तीत एकवटलेल्या असत. शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वातही राजकीय दूरदृष्टी आणि लष्करी नेतृत्व यांचा विलक्षण संयोग दिसून येतो. त्यांच्या कुशल राजनीतीमुळेच त्यांच्या सेनानायकत्वाला अपेक्षित यश लाभले. असामान्य क्षमतेचे राजकारणी म्हणून शिवाजी महाराज ऊर्जावान, धैर्यशाली, दूरदृष्टी असलेले आणि आवश्यक तेव्हा गुप्तता पाळणारे होते. त्यांची कल्पनाशक्ती प्रगल्भ व्यवहारज्ञानाने संतुलित होती. ते कठोर शिस्तीचे पुरस्कर्ते, उत्कृष्ट संघटक, थोर प्रशासक आणि समर्थ योद्धा होते. आयुष्यभर ते आपल्या अंतिम ध्येयापासून कधीही विचलित झाले नाहीत. संकटांनी त्यांना कधी खचविले नाही, तर यशानेही ते आत्मतृप्त झाले नाहीत.

नेता म्हणून ते आपल्या सैन्याचा आत्मा होते. सैनिकांच्या पराक्रमाइतकीच त्यांच्या दैनंदिन सुख–समाधानाचीही त्यांना काळजी होती. या जिव्हाळ्यामुळे त्यांनी सैनिकांचा अपार विश्वास आणि निष्ठा संपादन केली. त्यांच्या नेतृत्वात स्वाभाविक राजेशाही तेज होते, जे सर्वांनाच प्रत्ययास येत असे. शिवाजी महाराजांची महत्त्वाची नैतिक गुणवत्ता म्हणजे स्त्रियांविषयी असलेली त्यांची अत्यंत आदरयुक्त भूमिका. स्त्रीवर होणाऱ्या अत्याचारांचा त्यांना तीव्र तिरस्कार होता आणि अशा अपराधांबाबत ते अत्यंत कठोर होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com