Premium| Shivaji trade policy: युरोपियन व्यापाऱ्यांशी संबंध ठेवताना महाराजांनी अशा प्रकारे दूरदृष्टी आणि सावधगिरी दाखवली

Swarajya economy: युरोपियन व्यापाऱ्यांना व्यापाराची मुभा देतानाच महाराजांनी त्यांना राजकीय सत्ता प्रस्थापित करू दिली नाही. नाणी, जहाजे आणि बंदरांमधून त्यांनी स्वराज्याचे सार्वभौमत्व अधोरेखित केले
शिवकालीन नाणी
शिवकालीन नाणीesakal
Updated on
सतराव्या शतकातील सामाजिक-आर्थिक समृद्धीचे अधिष्ठान दोन प्रमुख आधारांवर उभे होते शेती आणि व्यापार. कृषी व्यवस्थेच्या सुयोग्य संवर्धनाबाबत शिवाजी महाराज जसे जागरूक होते, तसेच व्यापाराच्या वृद्धी आणि विस्ताराबाबतही त्यांची दूरदृष्टी तितकीच सक्रिय होती.

केदार फाळके

editor@esakal.com

मीठ उत्पादनाला संरक्षण

शिवाजी महाराजांनी मीठ उत्पादनाचा मक्तेदारी हक्क आपल्या हातात घेतला आणि त्यातून स्वराज्याला नफा मिळवून दिला. उद्योगविकासाला चालना देण्याविषयी त्यांची उत्कट आस्था होती. विशेषतः मीठ उद्योगाच्या प्रगतीकडे त्यांनी विशेष लक्ष दिले, कारण तो राज्याचा मक्तेदारी उद्योग होता. या उद्योगाला प्रोत्साहन मिळावे आणि बाह्य स्पर्धेमुळे—विशेषतः पोर्तुगीजांच्या मीठ उत्पादनामुळे—त्याचे नुकसान होऊ नये यासाठी शिवाजी महाराजांनी अधिक दराने आयातशुल्क लावले. त्यामुळेच त्यांनी कुडाळाच्या सुबादारास प्रभावळी ते कल्याण-भिवंडी या दरम्यानच्या भागात मीठावर उच्च दराने आयातकर आकारण्याचे निर्देश दिले.

येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की, शिवाजी महाराजांचा संरक्षणात्मक दृष्टिकोन दोन महत्त्वपूर्ण परिणाम घडवून आणतो. पहिला म्हणजे, जास्त दराच्या आयातकरामुळे स्थानिक बाजारपेठेत परदेशी मालाचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर कमी झाला आणि त्यामुळे देशांतर्गत उद्योगाला चालना मिळाली. दुसरा परिणाम असा की, जर उच्च आयातशुल्क असूनही परकीय वस्तु आणल्या गेल्या, तर त्यातून राज्याच्या महसुलात वाढ झाली. या धोरणामुळे पोर्तुगीजांच्या प्रदेशातून मिठाची आयात लक्षणीयरित्या कमी झाली आणि स्वराज्यातील बंदरांतून उत्पादित मिठाचा निर्यात व्यापार वाढीस लागला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com