

Vision 2026: Why Nagpur Needs Visionary Leadership, Not Just Promises
E sakal
Beyond Basic Amenities: What Newly Elected Leaders Owe to Nagpur
नितीन रोंघे
संयोजक, महाविदर्भ जनजागरण
महापालिकांच्या निवडणुका झाल्या आणि आता निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींकडे कारभार जाणार आहे. शहरांच्या स्वरूपामध्ये मोठा बदल झाला असून, समस्या आणि आव्हानेही बदलली आहेत. हा बदल समजून घेऊन त्याप्रमाणे स्वतःमध्ये बदल घडवून आणणारा नगरसेवक हवा आहे.
सुमारे महिनाभर महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू होती. राजकीय पक्ष, कार्यकर्ते, समर्थक यांच्यामध्ये सातत्याने महापालिकेच्या कारभाराविषयी चर्चा होत होती. प्रचाराच्या काळामध्ये सर्वच पक्षांनी महापालिकेच्या माध्यमातून अनेक कामांची आश्वासने दिली आहेत. आता लोकप्रतिनिधी पुन्हा येणार आहेत, त्यामुळे सर्वांच्याच अपेक्षा उंचावणे स्वाभाविक आहे. मात्र, शहरांचे स्वरूप आणि गरजा आमूलाग्र बदलल्या आहेत. त्या प्रमाणातच लोकप्रतिनिधींनीही स्मार्ट होत, दूरदृष्टीने विचार करणे गरजेचे आहे.