

Scope of Arts faculty after 12th
esakal
डॉ. अजित कानिटकर
पाल्य दहावी व बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर अनेक मध्यमवर्गीयांच्या घरांत चर्चा सुरू होते ती त्याने कोणत्या विद्याशाखेकडे जावे याची. बहुतांशी सर्व शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक वयोगटातील मुले-मुली व त्यांचे पालक अभ्यासक्रम निवडीच्या बाबतीत दोन-तीन विषयांच्या खोड्यातच अडकलेले दिसतात. कला शाखेचे महत्त्वही त्यांनी ओळखायला हवे.
इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा नुकत्याच संपल्या आहेत. परीक्षांच्या तणावातून मुक्त झालेले विद्यार्थी व मुख्यतः त्यांचे पालक आता यापुढे काय, या नव्या चिंतेने पुन्हा त्रस्त आहेत. गेल्या २५ वर्षांत बाह्य परिस्थिती वेगाने बदलली असली तरी दहावी व बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर अनेक मध्यमवर्गीय व बहुतांशी सर्व शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक वयोगटातील मुले-मुली व त्यांचे पालक अभ्यासक्रम निवडीच्या बाबतीत दोन तीन विषयांच्या खोड्यातच अडकलेले आहेत.